Board Exam Result : दहावी-बारावीची परीक्षा यंदा दर वर्षीच्या तुलनेत लवकर सुरू होत आहे. बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारीपासून, तर दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. त्यामुळे परीक्षांचा निकालही लवकरच जाहीर होईल, असे भुसे यांनी स्पष्ट केले. भुसे गांनी शुक्रवारी राज्य मंडळात शिक्षण विभागाची आद्यावा बैठक घेतली.
शिक्षण आयुक्त सच्चिद्र प्रत्तापसिंह, राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी, राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार या वेळी उपस्थित होते. शिक्षण विभागातील विविध विषयांचा आढावा त्यांनी घेतला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.
भुसे म्हणाले, जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्याशाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी शिक्षक, पालक, लोकप्रतिनिधी अशा सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत. विद्यार्थी संख्या कमी झाली म्हणून शाळा बंद करणे योग्य ठरणार नाही.
ती टिकवण्यासाठीच प्रयत्न करावे लागतील. मात्र, काही शाळांमध्ये पटसंख्या शून्य आहे, अशा वेळी धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल. पुरेशी विद्यार्थी संख्या असणान्या शाळांमध्ये विद्यानाचा व्यक्तिमत्त्व विकास चांगला होती, प्रगती चांगली होत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
निकालाची तारीख पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अशा वेळी समूह शाळांना विरोध करून चालणार नाही. शाळा बंद करण्याऐवजी विद्यार्थी संख्ग वाढवण्यावर सरकारचा भर राहणार आहे, असेही शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितले.
सीबीएसई अभ्यासक्रम
राज्यात नवीन शैक्षणिक धोरणाची (एनईपी) अंमलबजावणी करताना राज्यातील शाळांमध्ये ‘सेबीएसई पॅटर्न राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार 2025-26 या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीया पाठयक्रम हा राष्ट्रीय शैवाणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या मार्गदर्शक तत्वांनुसार तयार करण्यात येईल. बालभारतीमार्फत पाठ्बपुस्तकांती छपाई करण्यात येणार आहे.
या काळात राज्यातील शिक्षकांना नव्या पाठ्यक्रमाची माहिती देऊन, त्यांचे प्रशिक्षणही पूर्ण क पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर 2026-27 या शैक्षणिक प्रर्यापासून ‘सीबीएसई प्रमाणेच शाळांचे शैक्षणिक वर्ष १ एप्रिलपासून सुरू करण्याबाबतही चाचपणी करण्यात वेईल,” असे दादा भुसे यांनी सांगितले.
कधी लागेल निकाल
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ्ळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात देणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल १५ मेपर्यंत जाहीर होईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी शुक्रवारी पुण्यात दिली.