Talathi Bharti 2025 : राज्याच्या महसूल विभागामध्ये सुमारे 3000 पर्यंत रिक्त जागा आहेत, यामध्ये सर्वाधिक रिक्त पदे तलाठ्यांची आहेत, सध्याच्या परिस्थितीत एक तलाठ्याकडे तीन-चार गावाचा कारभार दिलेला आहे.
प्रत्येक गावाला आठवड्यातून एक दिवस तलाठी जातो अनेकदा एखाद्या गावात तलाठी पंधरा दिवसातून कधीतरी फेरी मारतो, यामुळे शेतकऱ्यांना बऱ्याच वेळा चावडीच्या पायऱ्या चढाव्या लागतात तलाठ्याचा हा भार अनेकदा कोतवालावर देखील येत असतो.
राज्यातील सर्वाधिक महसूल देणाऱ्या तलाठ्यांची जवळपास 2471 पदे रिक्त आहेत त्यामुळे सध्या कार्यरत असणाऱ्या तलाठ्यावरील भार कधी कमी होणार अस प्रश्न आता निर्माण झाला आहे. महसुल विभागात राज्यात सगळ्यात जास्त महसूल गोळा करण्यात तलाठ्याच्या गट क वर्गाचा पहिला क्रमांक लागतो.
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
प्रत्येक गावात चावडी व तलाठी कार्यालय असले तरी तिथे तलाठी असेलच याची शास्वती राहत नाही कारण एक तलाठ्यांकडे 3-4 गावाचा कारभार दिलेला असतो सातबारा,महसूल गोळा करणे,गारपीट पंचनामे करणे, नैसर्गिक आपत्ती, निवडणुकीच्या सर्व कामेसुद्धा करावे लागतात.
तर त्यांना गाव पातळीवर मूळ काम पूर्ण करणे अवघड जात असताना इतरही कामाचा भार त्यांच्या खांद्यावर दिला जातो. सहा महिन्यापूर्वी काही तलाठी पदे भरण्यात आले मात्र रिक्त पदे पूर्ण क्षमतेने भरलेले नाहीत.तलाठ्याच्या अतिरिक्त भार कधी कमी होणार याची आणखी खात्री नाही त्यामुळे सरकारी पातळीवर तलाठी भरती प्रक्रिया लवकर सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
जिल्हा निहाय तलाठ्याची रिक्त पदे
- अकोला – 48 जागा
- अमरावती – 78 जागा
- कोल्हापूर – 56 जागा
- गडचिरोली – 140 जागा
- गोंदिया – 717 जागा
- चंद्रपूर – 151 जागा
- जळगाव – 249 जागा
- जालना – 122जागा
- ठाणे – 81 जागा
- धाराशिव – 110जागा
- धुळे – 205 जागा
- नंदुरबार – 54 जागा
- अहिल्यानगर – 255 जागा
- नांदेड – 135 जागा
- नागपूर – 186 जागा
- नाशिक – 274 जागा
- परभणी – 15 जागा
- पालघर २४३ जागा
- पुणे 355 जागा
- बीड 913 जागा
- बुलढाणा 53 जागा
- भंडारा 67 जागा
- मुंबई उपनगर 41 जागा
- मुंबई शहर 17 जागा
- यवतमाळ 142 जागा
- रत्नागिरी २१० जागा
- रायगड 220 जागा
- लातूर ५५ जागा
- वर्धा 84 जागा
- वाशिम 26 जागा
- छत्रपती संभाजीनगर 154 जागा
- सांगली 110 जागा
- सातारा 156 जागा
- सिंधुदुर्ग 145 जागा
- सोलापूर 200 जागा
- हिंगोली – 76 जागा
एकूण 8614 तलाठ्याची रिक्त पदे संपूर्ण जिल्हा निहाय आहेत लवकरच तलाठी पदासाठी भरती जाहीर केली जाऊ शकते त्यामुळे मागच्या तलाठी भरतीमध्ये ज्या उमेदवारांचा नंबर नाही लागला त्या उमेदवारांना आता पुन्हा अर्ज भरण्याची संधी मिळू शकते.
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
FAQ
प्रश्न 1: तलाठी भरती 2025 कधी होणार आहे?
उत्तर: महसूल विभागात तलाठ्याच्या हजारो पदे रिक्त असल्यामुळे लवकरच तलाठी भरती प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. अधिकृत अधिसूचना जाहीर झाल्यावर अर्ज प्रक्रिया सुरू होईल.
प्रश्न 2: राज्यात किती तलाठी पदे रिक्त आहेत?
उत्तर: संपूर्ण महाराष्ट्रात सुमारे 8614 तलाठी पदे रिक्त आहेत. यामध्ये बीड, पुणे, नाशिक, गोंदिया, पालघर, रत्नागिरी, रायगड, नागपूर यांसारख्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक जागा आहेत.
प्रश्न 3: तलाठी पदासाठी पात्रता काय आहे?
उत्तर: तलाठी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे. संगणकाचे ज्ञान असणे अनिवार्य आहे. वयोमर्यादा व आरक्षण नियम शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लागू होतील.
प्रश्न 4: तलाठी पदाचे काम काय असते?
उत्तर: तलाठी हे गाव पातळीवरील महसूल अधिकारी असतो. त्याचे काम सातबारा नोंद ठेवणे, महसूल वसुली, गारपीट व नैसर्गिक आपत्ती पंचनामे, निवडणूक कामे, शेतकऱ्यांना माहिती देणे इत्यादी असते. सध्या एका तलाठ्याकडे 3–4 गावांचा कारभार असतो.
प्रश्न 5: मागील भरतीत अपात्र ठरलेल्यांना संधी मिळेल का?
उत्तर: होय. मागील भरतीत ज्यांचा नंबर लागला नाही, अशा उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे अधिकृत अधिसूचना जाहीर झाल्यावर अर्ज भरणे आवश्यक आहे.

मागील 5 वर्षांपासून ब्लॉगिंग करत आहे. नोकरी, नवीन योजना व बँकिंग क्षेत्रातील माहिती मी या ब्लॉगद्वारे देतो.सर्व माहिती ऑनलाईन स्रोतापासून मिळवून तुम्हाला देण्यात येते, काही अडचण असल्यास संपर्क साधावा.
1 thought on “महत्वाची अपडेट : तलाठी पदांची भरती;2471 पदे रिक्त! Talathi Bharti 2025”