Created by Sanvi, 04 May 2025
HSC Exam Result Date 2025 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे बारावीच्या परीक्षेचा निकालाचे आदेश सूचना जाहीर केलेले आहेत यादी सूचनेनुसार महाराष्ट्र बोर्ड चा बारावीचा निकाल उद्या दुपारी जाहीर केला जाणार आहे.
बोर्डाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या पत्रकार परिषदेमध्ये माहिती देण्यात आलेली आहे बोर्डाचा निकाल उद्या दुपारी एक वाजता लागणार असून दुपारी एक वाजेनंतर खाली तुम्हाला लिंक दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही तुमचा रोल नंबर टाकून निकाल पाहू शकणार आहात.
राज्यातल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या 5 मे रोजी जाहीर केला जाणार आहे महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल 5 मे दुपारी एक वाजता ऑनलाईन आहेत करण्यात येईल याबाबत राज्य शिक्षण मंडळाने माहिती दिली आहे तर मंगळवारी सहा मे 2025 पासून महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना गुणपत्रिका सुद्धा देण्यात येणार आहेत.
बारावीचा निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा
तुम्ही रिझल्ट कुठे पाहू शकता?
बारावीच्या निकालाविषयी संपूर्ण माहिती तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरून जाऊन पाहू शकता खाली चार लिंक दिलेल्या आहे त्या लिंक वरून जाऊन तुम्ही तुमचा निकाल चेक करू शकता.
निकाल पाहण्यासाठी तुम्हाला आपला रोल नंबर आणि आईचे पहिले नाव टाकण आवश्यक असणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट 2025 दरम्यान जाहीर केली जाणार आहे बारावीच्या परीक्षेमध्ये 15 लाख 13 हजार 999 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे.
11 फेब्रुवारी ते 11 मार्च 2025 दरम्यान ही परीक्षा राज्यभरातील 3373 परीक्षा केंद्रावर आयोजित करण्यात आलेली आहे. तुम्हाला जर निकाल पाहायचा असेल तर खाली लिंक दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही आपला निकाल सहजरित्या पाहू शकता.
सर्वरचा कोणताही प्रॉब्लेम येत असेल तर वेगवेगळ्या चार लिंक आहेत जे लिंक चालू राहील त्या लिंक वर जाऊन तुम्ही निकाल पाहू शकणार आहात.
उद्या दुपारी म्हणजे पाच मे 2025 रोजी हा निकाल जाहीर करण्यात येणार आहे विद्यार्थ्यांनी एक वाजेनंतर या लिंक वर जाऊन निकाल पाहायचा आहे.
दहावीच्या परीक्षेचा निकाल कधी?
दहावीचा निकाल देखील लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे दहावीच्या परीक्षेचा निकाल मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात 15 मे च्या अगोदर घोषित केला जाऊ शकतो. मार्च महिन्यात परीक्षा संपल्या, आता विद्यार्थ्यांनी निकालाची प्रतीक्षा लागलेली आहे.
मात्र अद्याप मंडळाकडून या निकालाचे कोणतीही अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही, दरम्यान राज्य मंडळाने 9 विभागीय मंडळामार्फत दहावी आणि बारावीची परीक्षा घेतली आहे या परीक्षेमध्ये गैरप्रकार रोखण्यासाठी कॉपीमुक्त अभियान राबवण्यात आले होते, राज्यभरात दहावीच्या परीक्षेत 89 बारावीच्या परीक्षेत 360 गैरप्रकारचे नोंद सुद्धा करण्यात आलेली आहे.